सांगा मी काय करु ? १. संजना सारंग शेवटचा सामोरा आ ला त्या ला आता तीन वर्षे होत आ ली होती. संजना सुरुवातीची दोन वर्षे त्याची खुप वाट बघायची , ति ला त्याच्या येण्याबद्दल कस लातरी विश्वास वाटायचा , खात्री वाटायची. तिचं हे आजारपण सुरु झाल्यानंतर सहा महिनेपर्यंत त्याचं येणं जाणं होतं , नंतर मात्र हळुहळु ते कमी होत गेलं. लग्नाच्या दुसर्याच वर्षी तिला पहिल्यांदा त्रास झाला. तसं शाळेत असताना एक दोनदा ती आजारी पडली होती , तेव्हा डॉक्टरनी तिचं हृदय काहीसं कमकुवत असण्याबद्दल सांगितलं होत. म्हणुन मग तिचं पुढचं शिक्षणही अर्धवटच राहुन गेलं. याच कारणामुळे लग्न जमणं अवघड वाटत असतानाच , बाबानी दूरच्या नात्यातल्याच एका मुलाबरोबर जमवुन आणलं. घरात फक्त ही तीनच माणसं , सासु थोडीशी जुनाट वळणाची असली तरी सारंग तसा स्वभावाने चांगला होता. एका खाजगी कंपनीत सिक्युरिटीची नोकरी होती. परिस्थिती अगदीच बेताची नसली तरी इतकी वाईटही नव्हती आणि म्हणुन लग्न जमवतानाच संजनाच्या बाबानी त्याना मुलीच्या आजारपणाची पुरेशी कल्पना दिली होती. संजनाचे आतासे कुठे सुखाचे दिवस सुरु झाले होते. ती जवळच्याच एका कंपन...
- Get link
- X
- Other Apps